मंगळवार, मार्च ०९, २०२१

HOME


         No Matter how strong you appear to the outside world, deep down in your core only you know how scared you are. You put up your strong side by wearing this mask, but you too are scared. Its okay! Your fears are rational and logical, so as your mask and pretention. You feel like crying your heart but you also know you can't. You have to hold back your tears for the sake of your loved one. After moving out and living far from them for past two years, you were somewhat used to it. But now, in these four months you are reintroduced to their presence, their warmth and the warmth of this place called HOME. You know you won't be able to see them, meet them for another year now on and this scares you. The task seems difficult and you are too anxious about it.

शुक्रवार, फेब्रुवारी २१, २०१४

सिक्कीमचे पुष्पवैभव

'आयुर्वेद महाविद्यालय शीव 'च्या  सिक्कीम टूर मध्ये आढळलेले हे पुष्पवैभव …… 
निसर्गाने इथे रंगांची ,सौंदर्याची उधळण करताना आपला हात जराही आखडता घेतलेला नाहीये ……. 






















शुक्रवार, जानेवारी ३१, २०१४

.......

तुम्ही एकटे असता म्हणून तर लिहिता. आणि लिहिता म्हणून तर एकटे असता . तुम्हाला लिहायचं असतं म्हणून तुम्ही एकटे असता आणि तुम्हाला एकट्याला असायचं असतं म्हणून तुम्ही लिहिता . तुम्ही एकटे होत जाता जसजसे लिहिता तसे आणि लिहित जाता जसजसे एकटे होता तसे ……… 
                                                                                                   -एकम (मिलिंद बोकील)

सोमवार, डिसेंबर ३०, २०१३

अपेक्षा

                          एखाद्याकडून अपेक्षा करणं चूक  कि बरोबर?नात्यामध्ये एकमेकांवर अपेक्षांचं ओझं लादू  नये ,कसलीही अपेक्षा न करता समोरच्यावर निखळ ,निर्व्याज्य प्रेम करावं असं  सहसा म्हटलं जातं . पण खरंच आपल्या रोजच्या जीवनात शक्य होतं का हे सर्व ?फळाची कसलीही अपेक्षा न करता आपण आपलं कर्म करत जावं ,असं श्रीकृष्णाने म्हटलंय गीतेत . पण खरंच वागतो का आपण असे ?हे सर्व आदर्श झालं हो . पण आपणा सामन्यांसाठी असतात का हे असले आदर्श ????
                             अपेक्षा  …………. मग नातं कुठलंही असो अपेक्षा या असतातच . मग समोरच्याकडून या नात्याबद्दल काही अपेक्षा धरणं चांगलं कि वाईट ?आई -वडील ,पालक आणि मुलं ,मित्र -मैत्रीण ,नवरा -बायको या सर्वच नात्यांत अपेक्षा असतात . आणि काही अंशी त्या रास्तही धरल्या जातात . 
                           माझ्या मते एखाद्याकडून काही अपेक्षा करणं चूक न्हवे . म्हणजे आपल्या माणसाकडून प्रेमाची ,आपलेपणाची अपेक्षा करण्यात कसली आलेय चूक ?आपण जर एखाद्याची काळजी करतोय ,त्याला जीवापाड जपतोय तर त्या माणसाकडून दोन प्रेमाच्या ,आपुलकीच्या शब्दांची परतफेड व्हावी अशी इच्छा करणं काही गैर नाही . नातं हि टू वे प्रोसेस असायला हवी . निदान भावनांच्या बाबतीत तरी . मग आपण जर काही देत असू तर समोरूनही तितकंच यावं हे अपेक्षित नाही ,पण त्याची सुरुवात तरी दिसावी . इतकंच . अपेक्षा करणं काही चूक नाही पण हा,या अपेक्षा अवाजवी असता कामा नयेत . अपेक्षा कराव्यात पण त्या अपेक्षांची किंमत ते नातं असू नये इतकंच …… 
                                       -मानसी ब्रीद



शुक्रवार, डिसेंबर २७, २०१३

सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी ......


काल रात्री WHATSAPP वर आलेला एक अप्रतिम MESSAGE  ……


                                                                   सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी 

                 आयुष्य छान आहे ,थोडे लहान आहे 
                 रडतोस काय वेड्या ?लढण्यात शान आहे 
                 अश्रूच यार माझा मदिरेसमान आहे  
                 काट्यातही फुलांची झुलती कमान आहे 
                 उचलून घे हवे ते ,दुनिया दुकान आहे 
                 जगणे निरर्थ म्हणतो ,तो बेइमान आहे
              
                 "सुखासाठी कधी हसावं  लागतं तर कधी रडावं लागतं ,कारण  सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं ……. "


         

सोमवार, डिसेंबर १६, २०१३

द्वंद्व

                                  क्षणाक्षणाला आपल्या मनात एक द्वंद्व सुरु असतं . .  चूक विरुद्ध बरोबर,चांगलं विरुद्ध वाईट ,अपेक्षित  विरुद्ध अनपेक्षित ,सत्य विरुद्ध असत्य ,हवंसं विरुद्ध नकोसं आणि  बरच काही …… पण मुळात हे द्वंद्व निर्माणच का व्हावं ?आपल्याच निर्णयावर फेरविचार सुरु केला की ह्याला सुरुवात होते . जे आहे ते जसच्या तसं स्वीकारलं ना ,आपल्या निर्णयावर जर आपण ठाम राहिलो न तर हा प्रश्नच उद्भवणार नाही कदाचित . पण बरेचदा आपण आपल्याच निर्णयावर फेरविचार करू लागतो आणि ह्या चक्रात अडकत जातो.  .आता आता पर्यंत बरोबर वाटणारी आपली किंवा समोरच्याची बाजू क्षणात चुकीची ठरवून मोकळं  होतो. काही गोष्टी जास्त विचार न करता केलेल्याच चांगल्या . कधी कधी अतिविचार हि बाधक ठरतो . अति विचार करून,समोरच्याची हि बाजू समजून घेण्याच्या नादात आपण अनपेक्षितरीत्या (कि अपेक्षितरित्या?) आपला निर्णय बदलतो . बरेचदा समोरच्या माणसासाठी . …… पण खरंच त्याने आपल्याला आनंद मिळतो का?
          आयुष्यात कधी न कधी मनाच्या एका कोपऱ्यात साठवलेली हि जखम पुन्हा ठसठसते . हो -नाही च्या हिंदोळ्यावर सतत झुलत राहिलं तर एखादा अपघात तर निश्चितच . या द्वंद्वात आपण कोणतीही बाजू घेतली न तरी पराजय हा आपलाच असतो . समोरच्याच्या बाजूने निर्णय घेतला कि तात्पुरता आनंद मिळतो . काहीतरी महान ,उदात्त केल्याचं समाधानही मिळतं . पण तात्पुरताच .समोरचा आपल्या निर्णयाने सुखावातोही . पण आपलं मन मारून समोरच्याला जिंक्वल्याच अप्रूप ओसरलं कि आपल्याला आपलाच राग येऊ लागतो . पश्चात्तापाचे  उमाळे येऊ लागतात . पण वेळ तर निघून गेलेली असते . कधी कधी आपल्या निर्णयावर ठाम राहूनही पश्चात्तापाची पाळी येते . कारण आपली बाजू समजून नाही घेतली म्हणून  समोरचा आधीच आपल्यापासून दूर झालेला असतो. शेवटी काय तर फेराविचाराच्या या द्वंद्वात चक्रव्युहात बळी गेलेल्या अभिमान्युसारखी अवस्था होते आपली . म्हणून कधी कधी आयुष्यात काही  गोष्टी  अति विचार न करताच  केल्या ना  तर फायद्याचं  ठरतं . 
                                      

           

रविवार, नोव्हेंबर २४, २०१३

नातं …

                                       

             नातं म्हणजे नक्की काय ? खरतरं  नातं म्हणजे प्रेम आणि विश्वास यांची एकसंध गुंफण . नातं मग ते कोणतेही असू  दे,ते सहज असावे . नात्यातील  सहजता हा नाती टिकवून ठेवण्यासाठीचा एक महत्वाचा घटक ठरतो . एखादी चूक झालीच जर आपल्याकडून तर ती चूक समजून घेऊन सावरूनही घेत यायला हवी .उद्या  कदाचित आपल्याकडून  ही  हे असं घडू शकत हे लक्षात ठेवून जर समजून घेण्याचा प्रयत्न केला न तर समजून घेणं हि सोपं जातं आणि सावरून घेणं हि …
             अशी  हि सहजता जपणारी नाती निभावताना मिळणारं समाधान हे नक्कीच जास्त मोलाचं असतं . आपण चुकलो ,धडपडलो तरी आपल्याला सावरणारं ,आधार देणारं आपलं हक्काचं माणूस आपल्या सोबत आहे याची फक्त जाणीवच बरंच बळ देऊन जाते . आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आणि नाती आपल्या आयुष्यात असणं फार महत्वाचं असतं . नातं नेहमी निःस्वार्थी असावं. निखळ  असावं . दोन व्यक्तींना जोडणाऱ्या नात्यात मोठेपणाचा आव ,श्रीमंतीचा बडेजाव,उपकारांची भाषा यांना थारा नसावा . कारण जेव्हा त्या नात्यातील एका व्यक्तीकडून अशा गोष्टी कळत -नकळत घडतात तेव्हा ते नातं ,नातं न राहता ओझं वाटू लागतं . या ओझ्याखाली समोरची व्यक्ती मात्र दबून जाते . नात्यांच्या या भिंतीला पहिली भेग ही इथेच जाते . अजून पुढे जाऊन निर्माण होणार्या समज - गैरसमज,तुलना ,इर्षा यामुळे ही भेग वाढत जाऊन नात्यांची हि भिंत दुभंगते . जोपर्यंत आपल्याला आपली चूक कळून येते तोपर्यंत फार मोठं नुकसान झालेलं असतं. मग आश्वासनं ,वचन ,माफी यांचं कितीही प्लास्टर केलं तरी ही नात्यांची भिंत काही पूर्वीप्रमाणे राहत नाही . 
                एकदा का नात्यातला एकसंधपणा लयास गेला कि त्या नात्याचा पूर्वीचा बाज कधीच परत येत नाही . नात्यातला हा दुभंग टाळण्याकरिता नात्यांना कायम प्रेम आणि विश्वास यांच्या भक्कम धाग्यात दोन्ही व्यक्तींनी समानपणे बांधून ठेवणे आवश्यक असते . कारण नातं  हे दोन्ही बाजूंनी तितक्याच समानतेने ,सहजतेने सांभाळावं लागतं. दोन्ही बाजूंनी तितकंच प्रेम,विश्वास,आपुलकी असणं हे नात्यांच्या दीर्घायुष्याच रहस्य आहे . त्यामुळे लादलेली नाती फार तकलादू ठरतात .मुळात नाती अशी लादता येतात का ?आपण जन्म घेतल्या क्षणापासूनच बरीच नाती आपल्याला येउन चिकटतात . पण केवळ रक्ताने जोडलं गेलोय आपण म्हणून आपलं नातं झालं असं असतं का?माझ्या मते नाती जुळण्यासाठी 'रक्त 'पेक्षा 'मन 'जुळणं जास्त महत्वाच ठरतं . अशी मन जुळलेली नाती दीर्घायुषी असतात . लादलं जातं ते नातं नसतंच मुळी . ती असते तडजोड …. काहीतरी मिळवण्यासाठी,स्वार्थासाठी,काहीतरी उद्दिष्ट ठेऊन केलेली .नातं हे लादायचं नसतं ते जपायचं असतं . जगायचं असतं . तरच आयुष्याचा प्रवास सुंदर बनतो . 
                आणि आयुष्याचा प्रवास म्हणजेच काय ?…. तर प्रेम आणि विश्वासाने नाती जपणं आणि जपता जपता जगणं …नाती आणि आयुष्यही ……………. !!!!!
                                                                  -मानसी ब्रीद